• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

कपिल पाटील विधानपरिषदेत १८ वर्षं आमदार होते, पण ते ‘प्रस्थापित आमदारां’सारखे कधीच वागले नाहीत…

विधानपरिषदेतील आमदारकी देखाव्यासाठी कपिल पाटील यांनी कधी खर्ची पाडली नाही. विषय किती विदारक असो वा विधायक, राजकीय असो की सांस्कृतिक, कपिल पाटील यांची वाणी आणि लेखणी धार काढून तयार असते. त्यांच्यातला पत्रकार, कार्यकर्ता सतत जागा असतो. समतेच्या हक्कासाठीची त्यांची लढाई रस्त्यावर आणि विधिमंडळात ते न थकता लढत आलेत.......

  • राजा कांदळकर
  • Sat , 27 July 2024
  • 0 Comments
  • 1 Like

‘चाकोरीपलीकडचा’ या पुस्तकाच्या नावाप्रमाणे लामखडे सर चाकोरी मोडीत जगले. सरांना पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!

लामखडे सरांच्या जीवनाची जडणघडण करणारे दोन गुरू आहेत. एक प्राचार्य कौंडीण्य आणि दुसरे साथी दुर्वे नाना. बी.ए.च्या शिक्षणापासून कौंडीण्य सरांचे मार्गदर्शन मिळाल्यापासून ते कौंडीण्य सरांच्या निधनापर्यंत आणि साथी भास्करराव दुर्वेंच्या पहिल्या परिचयापासून ते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाची वास्तू संगमनेरमध्ये उभारण्यापर्यंत लामखडे सर या गुरूंच्या अखंड सेवेत, विचारात कार्यरत राहिले.......

  • राजा कांदळकर
  • Sat , 27 July 2024
  • 0 Comments
  • 1 Like

शरद पवारांचं राजकारण संपणार की, पुढे जाणार आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाचे जहाज तरणार की अडखळणार, या दोन्हीचा फैसला या लोकसभा निवडणुकीत होणार आहे

तसं पाहिलं तर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचं भांडण जुनं आहे. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसींची संख्या साधारण समसमान आहे. पवार आणि आंबेडकर यांच्या राजकारणाची दिशा मराठाकेंद्रित आणि ओबीसीकेंद्रित अशी परस्परविरोधी आहे. पवार-आंबेडकर संघर्षाला अनेक नवे जुने पदर, कंगोरे आहेत. ते समजावून घेतले नाहीत, तर फसगत होऊ शकते.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 02 May 2024
  • 0 Comments
  • 1 Like

वाघसर ‘बौद्धमय’, ‘बुद्धमय’ झाले होते. तीच त्यांची जीवनशैली झाली होती, जीवनमार्ग झाला होता. त्यानुसारच ते जगले!

वाघ सरांमध्ये एक लहान मूल सतत दडलेलं असावं. लहान मुलाच्या निरागसपणे ते जगण्याकडे बघत असावेत. कुणाचा राग नाही, कुणाशी छक्केपंजे नाहीत, कुणाशी स्पर्धा नाही. त्यांना महान व्हायचा सोस नव्हता. सत्ता महत्त्वाची असते, हे त्यांना कळलं होतं; पण सत्ताबाजीत त्यांना रस नव्हता. स्वत:च्या संस्थेतही ते संस्थाचालकासारखे वागत नसत. कुणाचे मालक बनण्याची त्यांना गोडी नव्हती. आपण समाजाचं काम करतोय, हा भाव सतत त्यांच्याजवळ असे.......

  • राजा कांदळकर
  • Tue , 06 April 2021
  • 0 Comments
  • 2 Like

गजानन खातू : मूल्य पेरणारा, विधायक संघर्ष करत रचनात्मक कामांचा डोंगर उभा करणारा माणूस

खातूभाईंच्या सहवासात राहणाऱ्याला जाणवतं की, हा माणूस जाम आशावादी आहे. व्यक्ती, संस्था, प्रक्रिया याकडे निराशेने, नकारात्मकतेने बघायचं नाही, हा जणू त्यांनी निर्णय घेतलाय की, काय इतके ते स्वगतशील असतात. पण निराशावादी नसणं ही त्यांची स्ट्रॅटेजी नाही. ते जीवनमूल्य म्हणून त्यांनी स्वीकारलंय. राष्ट्र सेवा दलाचं अध्यक्ष होणं टळलं तरी खातूभाई सेवादलाच्या नावानं बोटं मोडताना दिसले नाहीत.......

  • राजा कांदळकर
  • Fri , 25 December 2020
  • 0 Comments
  • 1 Like

शेतीसंबंधीचे तीन काळे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत लढण्याचा संकल्प

कोल्हापूरमधील कागल येथील शाहू महाराज जन्मस्थळाला अभिवादन करून अभियानाची सुरुवात झाली. २४ सप्टेंबर हा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा वर्धापनदिन. त्याचे औचित्य हे अभियान सुरू करण्यात आले. कोविडविषयीचे प्रतिबंधात्मक नियम पाळून हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत सुरू होते. राज्यात जवळपास २५० ठिकाणी राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, समविचारी संस्था, संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला.......

  • राजा कांदळकर
  • Mon , 05 October 2020
  • 0 Comments
  • 2 Like

‘चांगली माणसं’ लक्षात राहावीत म्हणून लिहिलेल्या ‘ताम्रपट’ची पंचविशी!

‘ताम्रपट’ ही कादंबरी ९ ऑगस्ट १९९४ रोजी प्रकाशित झाली. या वर्षी तिला पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. पठारे म्हणतात – ‘चांगली माणसं लक्षात राहावीत म्हणून ‘ताम्रपट’ लिहिली. चांगली माणसं, आदर्शवाद कसा हरतो, सत्तास्पर्धेत कावेबाज अदूरदर्शी नेतृत्व कसं पुढे जातं, समाजावर कबजा मिळवतं, हे ‘ताम्रपट’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. नव्या पिढीला ते समजून घेता येईल.’.......

  • राजा कांदळकर
  • Fri , 07 June 2019
  • 0 Comments
  • 2 Like

फडणवीसांचं चातुर्य भेदणं महाराष्ट्र काँग्रेसला जमेल काय?

महाराष्ट्रात काँग्रेसची गाठ देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. फडणवीस काही मोदी, शहा, योगी यांच्यासारखे अहंकारी दिसत नाहीत. मराठा आरक्षण, शेतकरी मोर्चे, शेतकरी कर्जमाफी, दुधाचा प्रश्न हे मुद्दे त्यांनी स्वतःच्या स्टाईलनं हाताळले. कच्चा मुख्यमंत्री असता तर तो एव्हाना या मुद्यांनी गळाठून सत्तेवरून घरी जाता झाला असता. पण फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांना हाताळून सत्तेवरची मांड ढिली होऊ दिली नाही.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 19 December 2018
  • 2 Comments
  • 2 Like

नाणार प्रकल्प जाणार की राहणार? ते येत्या काळात दिसेलच...

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाणारसारख्या संवेदनशील विषयावर आपण जनमताचा रेटा लावून धरला असल्याचं दाखवणं ही शिवसेनेची राजकीय गरज आहे. अशा वेळी, अजून सुरूच न झालेल्या भूमीअधिग्रहणाच्या प्रक्रियेला स्थगिती देत मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनात भाजपला प्रकल्पग्रस्त कोकणवासीयांविषयी सहानुभूती आहे, हे दाखवत शिवसेनेवर पुन्हा एकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, एवढाच या घोषणेचा अर्थ आहे.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 05 December 2018
  • 3 Comments
  • 2 Like

धनगर आरक्षण प्रश्नाची कोंडी कशी फोडणार?

एसटी आरक्षण या प्रश्नाबरोबरच धनगर समाजात शेळी-मेंढी पालनाला चालना, पशुधन विमा, मेंढपाळांना संरक्षण, शेळ्या-मेंढ्या चराई वनजमिनी देणं, शेळ्या-मेंढ्यांची खरेदी वजनावर होणं हे प्रश्न येत्या काळात येरणीवर येतील. शिवाय अस्मिता, शिक्षण, समाजजागृतीचे प्रश्नही आहेत. या समाजातला बुद्धिजीवी वर्ग पुढे येऊन या प्रश्नांना कसा घेऊन जाईल, यावर पुढचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.......

  • राजा कांदळकर
  • Mon , 03 December 2018
  • 0 Comments
  • 1 Like

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारी मागील इंगित काय आहे? आताच त्यांना राममंदिर का आठवलं?

संघ परिवार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राममंदिराचा मुद्यावर देशात मतदारांची विभागणी करण्याची खेळी खेळेल असं दिसतंय. त्यात भाजपशी स्पर्धेत आपणही मागे राहायचं नाही, असा सेनेचा इरादा दिसतोय. संघ परिवार आणि सेनेच्या या ‘वोट बँके’च्या राजकारणाला मतदार किती भुलेल, हे येत्या काळात पाहायला मिळेलच.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 21 November 2018
  • 0 Comments
  • 4 Like

अभाविपची तालिबानी आणि रामचंद्र गुहांवर आणीबाणी!

उदारमतवादी संशोधक प्राध्यापक, विचारवंतांना बिचकवायचं, धमकवायचं, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातून हुसकवायचं हा रा. स्व. संघाचा जुना अजेंडा आहे. नवा, वेगळा विचार मांडणारे लोक रा. स्व. संघ परिवाराला नको आहेत. त्यांची नाकेबंदी संघाला करायची आहे. त्याचा भाग म्हणून गांधींच्या गावात गुहांना गांधी शिकवायची बंदी घालण्यात आली आहे, हे समजून घेतलं पाहिजे.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 15 November 2018
  • 0 Comments
  • 4 Like

हार्दिक, जिग्नेश, कन्हय्या, चंद्रशेखर : सत्तेविरोधातल्या नव्या हाका!

हार्दिक ते चंद्रशेखर... अघोषित आणीबाणी विरोधातल्या नव्या हाका... त्या रा.स्व.संघ, भाजप यांच्या सत्तेला प्रश्न विचारत विद्यार्थी तरुणांना, लोकांना जागं करताना दिसताहेत. हे नवे नेते आहेत. त्याच्या कार्यशैलीच्या तर्‍हा निरनिराळ्या आहेत. त्यातल्या काही नेत्यांचा अजेंडा, बलस्थान अजून अस्पष्ट आहे. हे सगळे पस्तीशीच्या आतले तरुण. त्यामुळे या नव्या नेत्यांविषयी काही निष्कर्ष काढणं घाईचं होईल.......

  • राजा कांदळकर
  • Tue , 30 October 2018
  • 2 Comments
  • 2 Like

काँग्रेसवर प्रस्थापितांचा शिक्का बसलेला आहे. राहुल गांधी त्यातून पक्षाला बाहेर काढण्यासाठी झटतात. तोच कित्ता सत्यजित तांबे महाराष्ट्रात गिरवतील?

‘बडे बाप के बेट्यांचा पक्ष’, ‘नातलगशाही’ हे आरोप करून भाजप काँग्रेसला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी युवक संघटनेत वंचित गटातले नेते पुढे आणून उत्तर देता येणं शक्य आहे. महाराष्ट्रात सत्यजित यांनी हा प्रयोग केला. किमान पन्नास वंचित घटकातले, राजकीय पार्श्वभूमी नसणारे युवक नेते त्यांनी उभे केले, तर ते या आरोपाला धुवून काढू शकतील.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 25 October 2018
  • 5 Comments
  • 3 Like

माओवाद्यांसारखी रा. स्व. संघावर कारवाई का होत नाही?

स्वयंसेवक, साधक, कार्यकर्ते ही शस्त्रं कशासाठी जमा करतात? ती कुणाविरोधी त्यांना वापरायची आहेत? का वापरायची आहेत? देशभर शेकडो गट अशी हत्यारं बाळगून आहेत. हा एक संघटीत गुन्हेगारीचा प्रकार नाही का? प्रकाश आंबेडकर यांनी जो न्याय माओवाद्यांना लावला जातो, त्याच न्यायानं संघ पदाधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि या हिंसक कारवायांवर चाप लावावा व देश वाचवावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 18 October 2018
  • 2 Comments
  • 8 Like

प्रकाश आंबेडकरांचं आव्हान नेमकं आहे तरी कुणाला?

आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची वाटचाल भाजपच्या पथ्यावर पडेल, असं म्हटलं जात असलं तरी खुद्द आंबेडकर ते नाकारतात. कोणत्याही परिस्थितीत ही सगळी ताकद काँग्रेसला सोबत घेत भाजप-मोदी हटवायला पणाला लावायची असा आंबेडकरांचा सूर दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मात्र आंबेडकर ठाम विरोधी भूमिकेत दिसतात.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 10 October 2018
  • 0 Comments
  • 5 Like

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या ‘पाणी’ न्यायाची ‘कुकडी’ कथा!

सात तालुक्यातील १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर क्षेत्रातील शेतजमीन कुकडी प्रकल्पाच्या पाण्यानं बहरणार आहे. या सात तालुक्यातील शेती या पाण्याने बागायती होईल. तिथलं शेती उत्पन्न वाढेल. दुष्काळ हटेल. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यांत विकासाची गंगा पाटपाण्यासोबत झुळझुळेल. चाळीस वर्षांची विकासाची तहान भागेल.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 26 September 2018
  • 0 Comments
  • 2 Like

‘स्टॅलिनपर्व’ अस्थिर तामिळनाडूला स्थैर्य देईल?

उत्तरेची मुजोरी आणि हिंदी भाषेला विरोध. तमिळ, द्रविड अस्मितेचा अहंगंड या कात्रीत आजपर्यंत तमिळ राजकारण हेलपाटत राहिलंय. या कात्रीतून स्टॅलिन कसा मार्ग काढतील? निर्णायकी तमिळनाडूला सर्वसमावेशक नेतृत्व ते देऊ शकतील काय, या प्रश्नांच्या उत्तरांना स्टॅलिन यांना येत्या काळात भिडावं लागणार आहे. शिवाय कमल हसन, रजनीकांत अशा लोकप्रिय नेत्यांशी त्यांना स्पर्धा करत स्वतःचं नेतृत्व सिद्ध करावे लागेल.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 12 September 2018
  • 0 Comments
  • 2 Like

संविधानाच्या विरोधात जे बोलतात, त्यांना ते बोलण्याचं स्वातंत्र्यही संविधानानेच बहाल केलंय!

हे संविधान मान्य नसणाऱ्यानांही निवडणुकीला उभं राहताना संविधानावर निष्ठा असल्याची शपथ घ्यावी लागते. संविधानाला गेल्या ७० वर्षांत अनेकदा परीक्षेला बसावं लागलं जरूर, पण ते परीक्षेत पास झाल्याचं दिसतं. संविधानानं आपली उद्दिष्टं पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. या संविधानाच्या विरोधात जे बोलतात, त्यांना ते बोलण्याचं स्वातंत्र्यही संविधानानेच बहाल केलंय, हे ते लोक विसरतात.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 05 September 2018
  • 0 Comments
  • 4 Like

नालासोपारा ते चिपळूण असा ‘सामाजिक स्वास्थ्य’ बिघडण्याचा प्रवास सुरू झालाय. तो महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार?

नालासोपाऱ्यात ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ हे विपरीत घडल्यानंतर चिपळूण (जि. रत्नागिरी) इथं एक आक्रित घडलं. संभाजी भिडे यांच्या बैठकीला चिपळूणच्या १४ सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन विरोध केला. नालासोपारा ते चिपळूण असा आपल्या शहरांचं सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा प्रवास सुरू झालाय. हा प्रवास महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार, हा खरा प्रश्न आहे.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 29 August 2018
  • 0 Comments
  • 3 Like

राजसाहेब, आर्थिक निकषांवर आरक्षण ही भ्रामक गोष्ट आहे हो!

आर्थिक निकषांवर आरक्षण ही भ्रामक गोष्ट आहे. तसं आरक्षण मराठा समाजाला मिळू शकत नाही. म्हणूनच सर्व पक्ष मराठा समाजाला तामिळनाडू फॉर्म्युल्याचा आधार घेऊन सामाजिक मागास म्हणून आरक्षण मिळावं, अशा निष्कर्षाप्रत आले आहेत. त्यादृष्टीनं सकारात्मक पावलं पडत असताना राज ठाकरे आणि इतरांनी आर्थिक आरक्षणाची मागणी करणं म्हणजे एकप्रकारे दिशाभूल करण्यासारखंच आहे!.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 01 August 2018
  • 9 Comments
  • 9 Like

संत, वारकरी संप्रदाय यांचं भिडे आणि संघ परिवाराला का वावडं आहे?

तुकोबारायांना देहूत धर्ममार्तंडांनी छळलं. गंबाजी-दंभाजी, मंबाजी त्या कारस्थानात पुढे होते. ज्ञानोबा माउलींना चांडाळ ठरवणारे धर्ममार्तंडच होते. संतांचा हा छळ लोक विसरलेले नाहीत. आता भिडे वारकरी संप्रदायाला तुच्छ लेखून महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचत आहेत, पुन्हा छळत आहेत. त्यामुळे भिडे आधुनिक मंबाजी आहेत.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 18 July 2018
  • 1 Comments
  • 6 Like

बोकड निर्यात बंदीची भानगड, जैनांच्या खांद्यावर रा. स्व. संघाची बंदूक

भारतात ९०-९५ टक्के समाज मिश्रहारी आहे. मांस हा त्याच्या अन्नातला महत्त्वाचा, जीवनावश्यक घटक आहे. आमचंच म्हणणं खरं, आमचाच विचार मोठा, शाकाहार हाच शुद्ध, अशी अव्यवहारी भूमिका घेणाऱ्या गटांना हा समाज, हा देश, त्याची संस्कृती कळलेली नाही. महात्मा गांधी शाकाहारी होते. पण ते मांसाहारींचा द्वेष करत नसत. गांधींना हा देश कळला होता.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 11 July 2018
  • 1 Comments
  • 5 Like

शिक्षक व पदवीधर निवडणूक निकाल : शरद पवारांचे डावपेच खरे का नाही झाले?

पवार म्हणाले होते, ‘डावखरे यांच्या विरोधात मी स्वतः उभा आहे असं समजा. डावखरे जिंकले तर मी हरलो असं होईल. माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.’ हे पवार का सांगत होते? राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांना ते इशारे देत होते काय? पण कोकणात काँग्रेसचा प्रभाव नाही. राष्ट्रवादी हा पक्ष घराण्यांमध्ये वाटला गेलाय. राष्ट्रवादी सरदारांचा पक्ष झालाय, सामान्य जनतेचा पक्ष राहिला नाही.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 04 July 2018
  • 1 Comments
  • 3 Like

प्रबळ राजकीय पक्षांतील लोकशाही संपली की, मग ती देशातही लोप पावते!

त्या आणीबाणीत सक्तीची नसबंदी, या आणीबाणीत जबरदस्तीची नोटबंदी, त्या आणीबाणीत विरोध तुरुंगात डांबले, या आणीबाणीत विरोधक नष्टच केले, त्या आणीबाणीत माध्यमावर निर्बंध लादले, या आणीबाणीत माध्यमं विकत घेतले, त्या आणीबाणीत न्यायाधीशांची गळचेपी, या आणीबाणीत न्यायाधीशांची घरी हुसकावणी, त्या आणीबाणीत देश खतरे में, या आणीबाणीत हिंदू खतरे में.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 27 June 2018
  • 0 Comments
  • 3 Like

पवारसाहेब, ‘फुले पगडी’ डोक्यावर घालणं सोपं आहे, पण त्या खालचा विचार जगण्यासाठी किंमत चुकवावी लागते!

पवारांनी ‘फुले पगडी’ वापरण्याचा सल्ला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिला. पण हे ‘पगडी पॉलिटिक्स’ पवारांना झेपेल काय? ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी पवारांच्या राजकीय चारित्र्याचं विश्लेषण ‘पवार हेच पवारांचे शत्रू’ असं अग्रलेख लिहून केलं होतं. पवार हे आर्थिक, सामाजिक भान, अभ्यास असलेले, अफाट ऊर्जा असलेले नेते आहेत. पण त्यांच्या भूमिकांवर सतत विश्वासार्हतेचं प्रश्नचिन्ह उभं राहत आलंय.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 20 June 2018
  • 1 Comments
  • 3 Like

शेतकऱ्यांचं दूध तापलंय. या तापलेल्या दुधाला थंड केलं जाईल की, दूध उतू जाईल? 

सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच दुधाचा प्रश्न पेटलाय, असा शेतकरी नेत्यांचा आरोप आहे. ७ जून हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शहरांचा दूध, भाजीपाला तोडण्याचा संपकाऱ्यांचा निर्धार आहे. तापलेल्या दुधाला थंड केलं जाईल की, दूध उतू जाईल? हा प्रश्न सुटला नाही, तर हे आंदोलन कसं वळण घेईल? हे येत्या काळात दिसेलच.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 06 June 2018
  • 1 Comments
  • 3 Like

‘कोब्रा पोस्ट’च्या ‘ऑपरेशन १३६’ या स्टिंग ऑपरेशनमधून दिसणारा भारतीय प्रसारमाध्यमांचा चेहरा

यापुढे छापलेल्या, दिसणाऱ्या बातमीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, हा ‘Cobrapost’च्या पुष्प शर्माच्या स्टिंग ऑपरेशनाचा मतलब आहे. पैशाच्या प्रभावानं प्रसारमाध्यमं कशी वागायला तयार आहेत, हे या ऑपरेशनमध्ये दिसतं. आता जातजाणीवेच्या प्रभावानं मीडिया कसा वागतो, हे उघडं करणारं स्टिंग ऑपरेशन कुणी केलं तर याच प्रसारमाध्यमांचा आणखी वेगळा चेहरा आपल्याला पाहायला मिळेल. तेही काम कुणीतरी करायला हवं.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 31 May 2018
  • 1 Comments
  • 4 Like

बोलका पंतप्रधान, कल्पक मंत्रिमंडळ, तगडा पक्ष, मग ‘अच्छे दिन’ का नाहीत?

रात्रंदिन काम करणारे पंतप्रधान भाषणं करताहेत, वारेमाप दौरे करताहेत, पण सरकार लोकांना खुश करताना, दिलासा देताना दिसत नाही, हे चित्र मोदी सरकार, भाजप यांच्यापुढे उभं राहिलेलं आव्हान आहे. ‘साफ नियत, सही विकास’ अशी घोषणा मोदी सरकारनं दिलीय, पण विरोधक ‘ना नियत साफ दिसतेय, ना विकास होताना दिसतोय’, असं म्हणताहेत. जरा जास्तीच बोलणारा कार्यक्षम पंतप्रधान आहे. पण लोकांच्या अडचणीत पूर्वीपेक्षा वाढ होताना दिसतेय, असा अजब अनुभव.......

  • राजा कांदळकर
  • Sun , 27 May 2018
  • 2 Comments
  • 4 Like

प्रकाश आंबेडकरांच्या ‘धनगर समाज कार्डा’चा मतलब

धनगर समाजाची ताकद प्रकाश आंबेडकरांना माहीत आहे. अधिकृत जनगणना जाहीर नसली तरी धनगरांची लोकसंख्या जवळपास दीड कोटीच्या आतबाहेर आहे. आंबेडकरांचा ‘अकोला पॅटर्न’ हा बहुजन जातींची मोट बांधून राजकीय यश मिळवण्याचा फॉर्म्युला आहे. पंढरपूरला प्रकाश आंबेडकरांनी धनगर समाजाला सुचवलंय की, तुम्ही पुढे आलात तर राज्याची सत्ता आपण मिळवू. धनगर समाजातील ही खदखद भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओळखली आहे.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 23 May 2018
  • 2 Comments
  • 1 Like

काँग्रेसला ‘धडा’ शिकवणारी कानडी कला

कर्नाटकात काँग्रेस फसली. अशी फसगत यापुढे होऊ द्यायची नसेल तर ‘राहुलला घालवा, प्रियंकाला आणा’ अशा बालिश गोष्टींवर चर्चा न करता मोदी-शहांच्या नव्या भाजपला समोरं जाण्याची व्यूहरचना आखायला हवी. तरच काँग्रेस वाचू शकेल. अन्यथा मोदी-शहांनी काँग्रेसमुक्त भारताचे प्रयत्न चालवले आहेतच. त्यांच्या बुलडोजरसमोर चिरडून नष्ट व्हायचं की नवी काँग्रेस उभी करायची, हा निर्णय राहुल गांधींना घ्यावा लागेल.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 16 May 2018
  • 2 Comments
  • 2 Like

कर्नाटक निवडणूक प्रचारात कुठलीच ‘लाट’ का नव्हती?

भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्वत:ची ‘लाट’ निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक प्रसारमाध्यमांना अळणी आणि मिळमिळीत वाटणं स्वाभाविक होतं. ‘मजाच येत नाही निवडणूक कव्हर करायला’ असं अनेक पत्रकार मित्र म्हणत होते. संभ्रम आणि ‘लाट’हीन निवडणुकीतून पुढची आव्हानं पेलणारं सरकार कन्नड जनतेला मिळेल किंवा कसं, हे येत्या काही दिवसांत पाहायला मिळेल.......

  • राजा कांदळकर
  • Tue , 15 May 2018
  • 2 Comments
  • 2 Like

सत्तेत नसूनही लोक आपल्याला ‘सत्ताधारी जमात’ का समजतात, हे कळलं तर जयंत पाटलांना राष्ट्रवादी पुढे घेऊन जाता येऊ शकेल!

आपण विरोधी पक्षात असूनही लोक आपल्याला सत्ताधारी जमात का समजतात, हे जयंत पाटलांना कळलं तर त्यांना राष्ट्रवादी पुढे घेऊन जाता येऊ शकेल. वाटेवरची फुलं कोणती, काटे कोणते हे उमगेल. नेत्यांची मुलंबाळं गोळा करून सत्तेची गणितं बांधायचे दिवस आता गेले. ज्यांच्या समाजात, गावात, कुटुंबात सत्ता अजून पोहोचली नाही, तिथले नवे नेते पुढे जो पक्ष आणेल त्याचीच सत्ता नांदणार आता यापुढच्या काळात.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 09 May 2018
  • 1 Comments
  • 2 Like

कर्नाटकातली निवडणूक कडवे हिंदू विरुद्ध उदार हिंदू यांच्यातली अटीतटीची लढाई आहे!

कर्नाटकातली निवडणूक ही कडवे हिंदू विरुद्ध उदार हिंदू यांच्यातली अटीतटीची लढाई आहे, असं सिद्धरामय्या सांगतात. त्यात तथ्य आहे. संघ परिवारानं कर्नाटक ही कट्टरवादाची प्रयोगशाळा बनवलीय. टिपू सुलतानला मध्ये आणून या प्रयोगशाळेला चालना दिली. उलट सिद्धरामय्यांनी लिंगायत धर्म चळवळीला पाठिंबा देऊन या प्रयोगशाळेला पाचर मारलीय.......

  • राजा कांदळकर
  • Tue , 08 May 2018
  • 1 Comments
  • 4 Like

'नाणार’च्या शिवारातले ‘डाव’पेच

राजकीय डावपेचात नाणार प्रकल्प अडकण्याची चिन्हं आहेत. आपमतलबी नेते आपल्या बगलबच्च्यांना ठेकेदारी, कंत्राट मिळावीत म्हणून सौदेबाजीची ताकद वाढण्यासाठी प्रकल्पविरोधी आंदोलन करताहेत की काय, अशी शंका यावी असे ‘डाव’ नाणार प्रकल्पविरोधात टाकले जात आहेत. असं होत असेल तर नाणारची वाटचाल एन्रॉन प्रकल्पासारखीच होणार हे उघड आहे.......

  • राजा कांदळकर
  • Mon , 30 April 2018
  • 2 Comments
  • 1 Like

भाजपचा मेळावा वादग्रस्त…शहा-फडणवीस नैराश्यग्रस्त

भाजपला श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी अशा सुसंस्कृत नेत्यांची मोठी परंपरा आहे. त्यांची भाषणं विरोधकही सहानुभूतीनं ऐकत. भाजपची जननी जनसंघ आहे. या जनसंघात अनेक शालीन नेते होते. त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा लोकांना भावत असे. आता भाजपनं जनसंघाच्या संस्कृतीपासून घटस्फोट घेतलाय की, काय असा प्रश्न विचारला जातोय.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 11 April 2018
  • 1 Comments
  • 3 Like

भाई वैद्य  : जितंजागतं समाजवादी विद्यापीठ

माणूस चारित्र्यवान आहे की नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या हातात सत्ता द्यावी आणि मग पारख करावी असं म्हणतात. भाई सत्तेत होते. तिथं ते भ्रष्ट झाले नाहीत. सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांचं चारित्र्य अधिक झळाळून तळपलं. जवळ आलेल्या प्रत्येकाला त्यांनी प्रेम दिलं आणि समाजवाद सांगितला. त्यांना अखेरचा निरोप देताना ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे साने गुरुजींचं गाणं गायलं गेलं. ते अतिशय समर्पक होतं!.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 04 April 2018
  • 0 Comments
  • 4 Like

लिंगायत समाज जिंकेल काय?

कर्नाटक सरकारनं अल्पसंख्याक दर्जा दिल्यानंतर महाराष्ट्रात हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठ एप्रिलला औरंगाबादेत लिंगायतांच्या ४० संघटना एकत्र येऊन एक रॅली काढणार आहेत. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे त्यात पुढाकार घेत आहेत. यापूर्वी यवतमाळ, लातूर इथं लिंगायत समाजाचे मोर्चे निघालेले आहेत. आता हा औरंगाबादचा मोर्चा कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा असणार आहे.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 28 March 2018
  • 0 Comments
  • 1 Like

राज ठाकरे आणि नवज्योतसिंग सिद्धू यांचं असं का होतं?

पंजाबी नवज्योतसिंग काय किंवा मराठी राज ठाकरे काय हे चांगले वक्ते आहेत म्हणून चांगले, प्रगल्भ नेते होतील असं नव्हे. त्यासाठी त्यांना स्वत:ची समग्र राजकीय विचारप्रणाली असावी लागेल. ती मुदलात या दोघांजवळही नाही. नवज्योतसिंग आणि राज यांना लाटा निर्माण होतात तशा भूमिका घ्याव्या लागणं हे अपरिहार्य आहे. त्यांच्यातल्या मर्यादांमुळे ते घडतं.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 22 March 2018
  • 1 Comments
  • 4 Like

शेत-शिवारातलं मूळ दुखणं दूर होत नाही, तोवर वावरातली आग भडकतच राहणार

या आंदोलनात आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी वावरातली आग त्यामुळे खरोखर शमेल काय? शेती-ग्रामीण भाग खूप मोठ्या अरिष्टातून वाटचाल करतोय. त्या आगीची धग बसतेय म्हणून मराठा मोर्चे निघाले. आताचा लाँग मार्च निघाला. शेत-शिवारातलं मूळ दुखणं जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत वावरातली आग भडकतच राहणार.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 14 March 2018
  • 1 Comments
  • 5 Like

चंद्रकांत पाटील कपिल पाटील यांच्यावर बिथरण्यामागचं खरं कारण काय आहे?

चंद्रकांत पाटील निष्ठावान स्वयंसेवक आहेत. संघविचार हा वर्चस्ववादी विचार आहे. या विचारात प्रत्येक माणसाची औकात ठरवून त्याला काम वाटून दिलेलं असतं. या अर्थानं संघ परिवारात औकात ही कल्पना खूप महत्त्वाची आहे. संघ परिवारात औकात जात, धर्म, वर्ण, लिंग बघून ठरते. म्हणून कनिष्ठ ठरवलेल्या जातीचा माणूस सरसंघचालक होत नाही.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 14 March 2018
  • 2 Comments
  • 4 Like

त्या मुलाखतीतून पवारांचा ‘राजकीय अजेंडा’ स्पष्ट झाला

येणारा काळ आघाड्यांचा राहणार हे स्पष्ट आहे. या आघाड्यांच्या सत्ता खेळात पवारांची भूमिका महत्त्वाची राहील. ती बजावण्याची पवारांची इच्छादेखील आहे, ती या मुलाखतीत व्यक्त झाली. पवार पंतप्रधान व्हावेत, ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. या इच्छेला यानिमित्तानं आणखी बळ मिळून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मनं नक्कीच सुखावली असणार.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 28 February 2018
  • 0 Comments
  • 1 Like

राजस्थानात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग

ओबीसी नेते अशोक चौधरींच्या लेटर बॉम्बनंतर दुसरे एक बंडखोर भाजप आमदार घनश्याम तिवारी यांनी वसुंधर राजे यांना हटवा अशी मोहीम सुरू केलीय. राजस्थानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद प्रभावी आहे. पण वसुंधरा राजेंविरोधी मोहिमेपासून संघ अंतर ठेवून आहे. नाराजांना संघाचा पाठिंबा नाही. पण वसुंधरा राजेंपासूनही संघ दूर आहे. या प्रकरणात संघाचा तटस्थपणा आणि मौन खूप बोलकं ठरावं.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 14 February 2018
  • 0 Comments
  • 2 Like

चंद्राबाबूंचा चाबूक

चंद्राबाबूंच्या चाबकाला हे असे इतर छोट्या-मोठ्या पक्षांचे हात लागले तर या चाबकात जोर येऊ शकतो. मग त्याचे जे फटके बसतील, त्यातून खूप मोठ्या उलथापालथी होऊ शकतील. कारण मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प निराशाजनक आहे, हे या पक्षांचं म्हणणं आहे. चंद्राबाबूंनी चाबूक उगारून या नाराजीला देशपातळीवर तोंड फोडलं आहे. तो उगारलेला चाबूक यापुढे काय काय करतो हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 07 February 2018
  • 0 Comments
  • 1 Like

धनगर सिद्दरामय्या हिंदूविरोधी कसे?

कर्नाटक जिंकण्यात सिद्धरामय्या हा मोठा अडथळा आहे, हे शहांसारख्या चतुर राजकारण्यानं जोखलं आहे. मुळावर घाव घालायचा म्हणून शहांनी कर्नाटकात मागच्या आठवड्यात सिद्धरामय्या हिंदूविरोधी आहेत अशी गर्जना केलीय. पण जातीनं धनगर असलेले सिद्धरामय्या जीवनशैलीनं हिंदू आहेत. अमित शहांच्या डोक्यातला हिंदू धर्म वेगळा असेलही. पण त्याआधारे ते सिद्धरामय्यांचं हिंदूपण काढून कसं घेऊ शकतील? .......

  • राजा कांदळकर
  • Wed , 31 January 2018
  • 2 Comments
  • 3 Like

‘तरुणांना धरा आणि नासवा’ हे भिडे गुरुजींचं तंत्र घातक आहे

भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये तरुणांची भरती कशी केली जाते, याविषयी पुढे येणारी माहिती अस्वस्थ करणारी आहे. भिडे आणि त्यांचे समर्थक सांगली-सातारा-कोल्हापूर परिसरात १५ ते २५ वयोगटातील मुलांना ठरवून शिव प्रतिष्ठानमध्ये ओढतात. त्यांच्या मनात द्वेष पेरतात. मुस्लिमांविषयी तिरस्काराची भावना निर्माण करतात. द्वेष आणि तिरस्कारानं मन कलुषित झालेले तरुण मग शिव प्रतिष्ठानच्या पालखीचे भोई बनतात.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 24 January 2018
  • 8 Comments
  • 11 Like

नव्या नेत्यांच्या ‘हुंकारा’चा अर्थ

सत्ता लोकांपासून लांब जात चालली, दडपशाही करती झाली की, लोकांतून नवे नेते येतात. हे नवे नेते सत्ताधारी झाले की, पुन्हा सत्ता त्यांना रंग दाखवते. सत्ता त्यांना स्वत:मध्ये सामावून घेते. मग अनेकदा जनतेचा भ्रमनिरास होत जातो. सत्ता ही आहेच अशी मायावी चीज. तरीही सत्तेला ललकारण्याचा पायंडा लोक सोडत नाहीत. सध्याचे तरुण-विद्यार्थी नेते देशभर सत्तेला ललकारत आहेत. त्यामागे हेच सूत्र आहे.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 17 January 2018
  • 3 Comments
  • 6 Like

नवी द्वेषभूमी दुसरी अयोध्या करायचीय काय?

लोकांना रोजगार, भाकरी, आरोग्य, शिक्षण देता येत नसेल तर धर्म, जात भावनेच्या झुल्यात झुलवा. लोकांचा सरकारवरचा राग निवळून जातो असं म्हणतात. फडणवीस सरकार या सूत्राचा वापर यापुढच्या काळात करेल? त्यासाठी भिडे-एकबोटे आर्मीचा कसा वापर होईल? महाराष्ट्र अवघड वळणावर उभा आहे. कारण त्या वळणावर नवी द्वेषभूमी साकारतेय.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 03 January 2018
  • 2 Comments
  • 2 Like

‘दुभंगलेला गुजरात’ भारतभर पसरला तर…?

गुजरातमध्ये उघडा पडलेला विशिष्ट प्रकारचा विकासवादी, द्वेषवादी मतदार भारतभर विस्तारला तर २०१९मध्ये देशाचा ‘गुजरात’ होऊ शकतो. मोदींना जो न्यू इंडिया हवाय, तो असा असेल तर संविधानानं दिलेली ‘आयडिया ऑफ इंडिया’ची संकल्पना धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. माणसाचा विचार करण्याचा अवयव हा मेंदू नसून खिसा आहे, हे जागतिकीकरणोत्तर काळात जास्त स्पष्ट होतंय. जगभर हे दिसतंय.......

  • राजा कांदळकर
  • Tue , 26 December 2017
  • 0 Comments
  • 1 Like

आंदोलनांची ‘गुजरात क्रांती’!

देशभरच्या आंदोलनांना गुजरातच्या आंदोलनकर्त्यांनी एक महत्त्वाचा धडा दिलाय की, नुसतं आंदोलन उभं करून उपयोग नाही, तर मतपेटीतून सत्तापक्षाला आंदोलनकर्त्यांची ताकद दाखवून द्यावी लागते. देशभरातील आंदोलनकर्ते हार्दिक, जिग्नेश, अल्पेश आणि छोटुभाई यांच्याकडून हा धडा शिकले तर ‘गुजरात क्रांती’ची पुनरावृत्ती देशात इतरत्रही होऊ शकेल.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 20 December 2017
  • 0 Comments
  • 1 Like

अमित शहांना इशारा, नरेंद्र मोदींना दिलासा

भाजपला या निवडणुकीनं संदेश दिलाय की, अमित शहांची दादागिरी चालणार नाही. नरेंद्र मोदी यांचा विकासाचा विचार ठीक आहे. यापुढे भाजपनं विकास केला पाहिजे, अन्यथा आम्ही अन्य पर्याय निवडू असा इशारा गुजराती मतदारांनी दिलाय. गुजरातचा जनादेश २०१९सालासाठी मार्गदर्शक ठरेल असा आहे. भाजपने लोकांचे प्रश्न सोडवले तर ठीक, नाहीतर आम्ही काँग्रेसला निवडून देऊ, सत्तेवर बसण्याची संधी देऊ हा संदेश या निवडणुकीनं दिलाय.......

  • राजा कांदळकर
  • Tue , 19 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया, सर्व्हे-पोल यांनी झाकोळली गुजरातची निवडणूक

गुजरात निवडणूक निकाल सर्व्हे, पोल यांविषयी शंका व्यक्त करण्यात आली. तसं बघितलं तर दिल्ली, बिहार विधानसभा निवडणुकीतच निवडणूक सर्व्हे चाचण्यांचा फोलपणा उघड झाला होता. त्यांच्यावरचा सत्तापक्षाचा प्रभाव जाहीर झाला होता. आता तर त्यांची विश्वासार्हता पूर्ण रसातळाला गेली आहे. या चाचण्यांचे सॅम्पल, त्यांची निवड, पद्धत याबद्दल पारदर्शकता नसते, असं योगेंद्र यादव यांनीच म्हटलं. ते बोलकं आहे.......

  • राजा कांदळकर
  • Mon , 18 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

‘गुजरात मॉडेल’मध्ये उद्योगपती आहेत, आदिवासी नाहीत!

देशभर गवगवा झालेल्या विकासाच्या गुजरात मॉडेलमध्ये आम्हाला स्थान आहे की नाही, हा आदिवासींचा या निवडणुकीतला सवाल होता. त्या सवालावर भाजप नेते मूग गिळून गप्प होते. अनेक आदिवासी गावांत भाजप उमेदवारांच्या विरोधात आदिवासींनी रोष व्यक्त केला होता. पण त्याच्या ना बातम्या झाल्या, ना टीव्हीच्या स्टुडिओत त्या घोषणांचा आवाज पोचला.......

  • राजा कांदळकर
  • Mon , 18 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गुजरातमधल्या राजकीय भूकंपाच्या खाणाखुणा प्रसारमाध्यमांना का दिसल्या नाहीत?

सत्ताधारी, प्रसारमाध्यमं यांचा यातून राजकीय भूकंपाच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न आहे, पण भूकंप तर होणारच आहे. त्याच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करून तो टळणार थोडाच आहे? हा भूकंप काँग्रेसच्या कर्तबगारीमुळे घडणार नसून, तर सत्ताधारी भाजपच्याच नादारीमुळे घडणार आहे. भाजपनं वाढवलेल्या लोकांच्या पिडेत त्याची पाळंमुळं आहेत.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 14 December 2017
  • 1 Comments
  • 3 Like

‘नो पॉलिटिक्स इज अवर पॉलिटिक्स’ हेच गुजराती मुस्लिमांचं ‘पॉलिटिक्स’!

“भाजप तर हिंदुत्ववादी पक्ष आहे. तो मुस्लिमांना जवळ करत नाही. उलट २००२च्या दंगलीत त्यांनी मुस्लिमांचा आवाद दडपला. तोंड दाबून टाकलं. त्यानंतर मुस्लिम समाजाचा आवाज आजतागायत बंद आहे. आम्ही आमच्या मुलांना सांगतो- ‘शाळा शिका, कॉलेज शिका, धंद्याचं शिक्षण घ्या. धंदे वाढवा.’ सामाजिक-राजकीय जीवनात वावरायला आजही आम्हाला भीती वाटते. म्हणून धंदा आणि घर हेच आमचं जग आहे.”.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 13 December 2017
  • 1 Comments
  • 4 Like

अमित शहा यांच्या हिकमती नेतृत्व शैलीच्या आख्यायिका

शहा यांच्या नेतृत्वशैलीची एवढी चर्चा करण्याचं कारण काय? तर हा काही एका व्यक्तीचा राजकीय प्रवास नाही. तर ते गुजरात भाजपचे कार्यकर्ते, नेते यांच्या समोरचं ‘रोल मॉडेल’ आहे. आज गुजरातमध्ये शहा यांच्या पावलावर पाऊल टाकत तालुक्या तालुक्यात, वॉर्डावॉर्डात छोटे छोटे अमित शहा कार्यरत आहेत. ते सर्वजण सार्वजनिक आयुष्यात साम, दाम, दंड, भेद वापरून भाजप वाढवत आहेत, मोदी यांना ताकद देत आहेत.......

  • राजा कांदळकर
  • Tue , 12 December 2017
  • 0 Comments
  • 5 Like

गुजराती माणसांच्या राजकीय वर्तनाचं व्याकरण

यावेळची गुजरात विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक आहे. या निवडणुकीत भाजप हरला तर ‘मोदी लाट’ संपली असा अर्थ काढला जाईल. आणि भाजपच्या केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील सत्तेचा ‘परतीचा प्रवास’ सुरू झाला असंही समजलं जाईल. समजा भाजपची हार नाही झाली आणि विधानसभेतल्या जागा कमी झाल्या तरी गुजरातवरची भाजपची पकड ढिली झाली असं म्हटलं जाईल.......

  • राजा कांदळकर
  • Mon , 11 December 2017
  • 1 Comments
  • 5 Like

पंचवीस वर्षांची भळभळती जखम

पंचवीस वर्षाच्या या भळभळत्या जखमेपासून काय धडा घ्यायचा? इतिहास व धर्म यांचा योग्य अर्थ लावायचा की, आपल्याला सोयीचा अर्थ माजवायचा? योग्य अर्थ लावून एकोप्यानं राहायचं की एकमेकांशी भांडत बसायचं, दंगली खेळायच्या? साडेसातशे वर्षं भारतात हिंदू-मुस्लिम सहजीवन चालत आलंय. ते पहिल्यांदा १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात मोडून पडलं. ६ डिसेंबर १९९२ साली त्या सहजीवनाला दुसरा मोठा जबर तडा गेला.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 06 December 2017
  • 1 Comments
  • 2 Like

भाजपची ‘निष्ठावंतां’ना डावलून ‘थैलीशहा’ला विधान परिषदेची उमेदवारी

आपल्याकडे राजकीय पक्ष चालवताना जात, धर्म, थैली, लिंग, घराणं या गोष्टींना खूप महत्त्व आहे. विचार, निष्ठा, प्रामाणिकपणा या गोष्टी बोलण्यात असतात. पण त्यांचा प्रभाव खूपच कमी दिसतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्व पक्षांत हे चालतं. कुणीही यातून सुटत नाही. आपला समाजही त्याला पूरक आहे, असं दिसतं. पैसेवाल्या उमेदवाराला समाज नाकारतो असं दिसत नाही.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 30 November 2017
  • 0 Comments
  • 2 Like

कमल हसन यांनी बंड केलंय आणि त्याची भाषा व दिशाही स्पष्ट केलीय

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपला दक्षिणेत कोंडीत पकडण्यासाठी मोदी विरोधकांना कमल हसन हा मोहरा उपयोगी पडणार आहे. कमल म्हणजे कमळ. दक्षिणेत कमळ विरुद्ध कमल अशी लढाई उभी राहणार हे उघड आहे. कमल हसन यांनी बंड केलंय, त्या बंडाची भाषा आणि दिशाही स्पष्ट केलीय. एका तमिळी ब्राह्मणाचं बंड सुफळ संपूर्ण कसं होईल हे येत्या काळात पाहायचं.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 23 November 2017
  • 1 Comments
  • 5 Like

विश्वास नांगरे पाटील सांगलीच्या ‘त्या’ चिमुरडीचा काय हो गुन्हा?

पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारी ही घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं असताना आणि कर्तबगार आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या अधिकार क्षेत्रात घडावी याचं जास्त आश्चर्य वाटतं. कर्तबगार प्रतिमा असणाऱ्या नांगरे पाटलांकडून कामठेसारख्या हैवानाची कृत्यं सुटतात कशी? यापूर्वीच कामठेंवर कारवाई का होऊन शकली नाही? .......

  • राजा कांदळकर
  • Thu , 16 November 2017
  • 3 Comments
  • 3 Like

शरद यादव ‘जयप्रकाश नारायण’ होतील काय?

नव्या भाजपविरोधी प्रयोगात शरद यादव जयप्रकाशांची भूमिका बजावू शकतील काय, या प्रश्नाचं उत्तर काळाच्या पोटात दडलेलं आहे. राजकारण ही खूप निसरडी प्रक्रिया असते. त्यात काय काय घडेल हे सांगता येत नाही. पण शरद यादव हे अभ्यासू, लढावू आणि चारित्र्यवान नेते आहेत. हवाला पैसा देवघेवीत नाव आलं तर त्यांनी तत्काळ  खासदारकी सोडली होती. ते सत्तेमागे पळणारे नेते नाहीत. सत्तेला अंगावर घेणारे आहेत.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 09 November 2017
  • 1 Comments
  • 4 Like

फडणवीस तसे चांगले, पण…

सत्ता आपल्या बगलात असंतोषाला जन्म देत असते. या असंतोषाच्या आगीतच तिचा अंत असतो. फडणवीस हे चतुर आहेत. त्यांना याची जाण असणारच. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्याभोवती कोणते तालेवार अधिकारी लोंडा घोळतात, कोणते उद्योगपती हेलिकॉप्टरनं घिरट्या मारतात, कोणते कंत्राटदार बंगल्यावर रेंगाळतात, हे सामान्य लोक बघतात. त्यावरून त्या सरकारची जनमाणसातली प्रतिमा वाढते किंवा बुडते.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 01 November 2017
  • 0 Comments
  • 3 Like

नोकरशहा आणि राज्यकर्ते यांची मिलीभगत एसटी महामंडळाला गोत्यात आणतेय

दिवाकर रावते, चंद्रकांतदादा पाटील हे दोन्ही वरिष्ठ मंत्री संपकाळात ज्या पद्धतीनं वागत होते, ती पद्धत जबाबदारीचं भान असणारी नक्कीच नव्हती. प्रवाशांचे हाल होत असताना, एसटी कामगार पराकोटीचे नाराज असताना अशी एकमेकांशी लढवण्याची भाषा वापरून काय साधू पाहत होते? राज्यात बसडेपोवर अशांतता माजावी, अशी त्यांची इच्छा होती की, काय? सरकारला हे शोभादायक नव्हतं.......

  • राजा कांदळकर
  • Tue , 24 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

वारकरी, साईभक्तांना सरकार का डिवचतंय?

पंढरपूर, शिर्डी ही ठिकाणं महाराष्ट्राच्या समन्वयी सांस्कृतिक, आध्यात्मिक परंपरेचा वैभवशाली वारसा असलेली केंद्र आहेत. पंढरपूरच्या देवस्थानात राजकारण करणं किंवा साईबाबांच्या शिर्डीत त्रिशुळ आणून सबुरी आणि सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाला नख लावणं. भक्तांच्या श्रद्धा दुखावणं. या फंदात शहाण्या राज्यकर्त्यांनी पडू नये हेच सोयीस्कर असतं. धर्म, अध्यात्म, श्रद्धा या नाजूक गोष्टींशी खेळणारे राज्यकर्ते बदनाम होतात.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 11 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

अंगणवाड्यांच्या अंगणातला असंतोष

गेल्या चाळीस वर्षांत लाखो ताई आणि मावशींच्या त्यागातून उभी राहिलेली अंगणवाडी व्यवस्था खाजगी कंत्राटदार आणि कंपन्यांच्या घशात घालायची, नष्ट करायची अशी योजना सरकार दरबारी शिजतेय, असा आरोप अंगणवाडी संपाचे नेते करत आहेत. हे खरं असेल तर ते खूप गंभीर आहे. गरिबांसाठी जीवन बनलेली अंगणवाडी व्यवस्था उद्ध्वस्त झाली तर ‘न्यू इंडिया’ तर घडणारच नाही, पण पुढच्या पिढ्याही माफ करणार नाहीत.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 27 September 2017
  • 0 Comments
  • 4 Like

नाना पटोलेंचं बंड सुफळ संपूर्ण होईल?

भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक मोहऱ्यांना पावन करून घेत असताना त्यातलाच एक मोहरा कसा उलटतो याचा अनुभव भाजपला यानिमित्तानं येत आहे. आज पटोले एकटे आहेत. उद्या त्यांना जोड मिळाली आणि आणखी काही नाराज खासदार-आमदार या बंडाच्या झेंड्याखाली उभे राहणारच नाहीत असं नाही. आणि हे बंड राज्यपातळीवर भडकू शकत नाही असंही कुणी खात्रीनं म्हणू शकणार नाही.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 20 September 2017
  • 0 Comments
  • 2 Like

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बहादूर शहाची अपुरी इच्छा पूर्ण करायला हवी

मायभूमीत दफन करण्याची बहादूर शहाची इच्छा इंग्रजांनी पूर्ण होऊ दिली नाही. पण दिल्लीत महरौलीत स्मारक असावं, अशी बहादूर शहाची इच्छा होती. ती मोदींना पूर्ण करता येऊ शकेल. म्यानमारमधील बहादूर शहाची कबर भारतात दिल्लीत आणावी, अशी बहादूर शहा प्रेमी भारतीयांची मागणी आहे. ती लक्षात घेऊन मोदींनी बहादूर शहाची कबर भारतात आणण्यासाठी पुढाकार घेतला, तर त्या कवी मनाच्या राजाचं आपल्या मायभूमीत विसावण्याचं स्वप्न पूर्ण होईल.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 14 September 2017
  • 1 Comments
  • 2 Like

राज्य सरकारला न्या. अभय ओक यांची अ‍ॅलर्जी का आहे?

न्या. ओक पक्षपाती भूमिका घेतात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी भर न्यायालयात केली आणि सर्वत्र शांतता पसरली. न्या. ओक यांना दूषणं देऊन आणि मुंबई उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करून फडणवीस सरकारनं चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य म्हणजे स्वतःची फटफजिती करून घेतली!.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 30 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

टिळकभक्तांनो, मन करा रे थोर!

टिळकभक्तांनी मन मोठं केलं पाहिजे. गणेशोत्सवाचं जनकत्व निर्विवादपणे भाऊसाहेब रंगारी यांना देऊन हा वाद मिटवायला हवा. त्यामुळे लोकमान्य टिळकांची थोरवी आणखी वाढेल. कारण अशा वादात मन मोठं करण्याची भूमिका खुद्द टिळकांनी अनेक ठिकाणी, अनेक वेळा घेतलेली दिसते. टिळक हे मोठेच आहेत, याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. रंगारी यांना त्यांचा मान दिल्यानं त्यांचं मोठेपण उणावण्याचंही काहीएक कारण नाही.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 23 August 2017
  • 0 Comments
  • 3 Like

माणूस मोठा ताकदीचा, पण...

१९६५ नंतरची दोन दशकं महाराष्ट्रातील तरुण वर्गात मोठी जागृती आणि चळवळ निर्माण करणाऱ्या ‘युक्रांद’ या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत, अहमदनगरचे माजी आमदार, ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष आणि ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आज वयाची पंचाहत्तरी पूर्ण करून ७६ व्या वर्षांत पदार्पण केलं. त्या निमित्तानं हा लेख.......

  • राजा कांदळकर
  • Mon , 21 August 2017
  • 1 Comments
  • 4 Like

मेहतांचा ‘आड’, देसाईंची ‘विहीर’

एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि देसाई-मेहतांना भलताच न्याय लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचीही अडचण करून घेतली आहे. आजपर्यंत फडणवीस स्वतःची प्रतिमा ‘मिस्टर क्लीन’ अशी रंगवण्यात यशस्वी झालेले आहेत, पण देसाई-मेहता प्रकरण पुढे चिघळलं तर त्यांना आपली प्रतिमा जपण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. एका अर्थानं फडणवीस यांच्यापुढे मेहतांचा ‘आड’ आणि देसाईंची ‘विहीर’ येत्या काळात उभी राहिली नाहीतरच नवल.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 16 August 2017
  • 0 Comments
  • 3 Like

५८व्या मूक मराठा मोर्च्यावरील टळलेली तीन विघ्नं

९ ऑगस्ट २०१६ला औरंगाबादमध्ये पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला. तेव्हापासून कालच्या मुंबईच्या ९ ऑगस्टच्या मोर्च्यासह गेल्या वर्षात राज्यभर ५८ मोर्चे निघाले. मुंबईचा मोर्चा निर्वाणीचा होता. लोकांचा सरकारवर रोष होता. मोर्च्याची कोणतीच मोठी मागणी सरकार मान्य करत नाही म्हणून लोकांमध्ये संताप होता. या पार्श्वभूमीवर काही आगळीक घडू नये, असा प्रयत्न होता. तरीही तीन विघ्नं येऊ पाहत होती.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 10 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

कलामांच्या हातात संविधान दिलं नाही म्हणून काय झालं?

तिरुवल्लुवरांचा काव्यग्रंथ कलामांजवळ नाही आणि ‘गीता’, ‘कुराण’, ‘बायबल’ ठेवलंय. हातात वीणा दिलीय, यावर आक्षेप घेत द्रविडी संघटनांनी हे कलामांचं वैदिकीकरण करण्याचा डाव असल्याचं म्हटलंय. द्रविडी लोक, तमिळी लोक हे सांस्कृतिक आक्रमण खपवून घेणार नाहीत. आमचा विरोध जारी ठेवणार, अशी या संघटनांची भूमिका आहे. द्रविड विरुद्ध वैदिकी असा वाद तमिळनाडूला नवा नाही.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 02 August 2017
  • 0 Comments
  • 3 Like

परान्जोय गुहा ठाकुरता, निखिल वागळेंवर सत्तेचा बहिष्कार का आहे?

काय लपवायचं आणि काय दाखवायचं याचे सत्ताधाऱ्यांचे हिशेब स्पष्ट असतात. हिशेब धुळीस मिळवण्याची क्षमता आरशात असते. प्रणोजॉय गुहा ठाकुरता-निखिल वागळे हे लोक असे आरसे घेऊन हिंडतात. सत्ताधाऱ्यांना दाखवतात. तेच सत्ताधाऱ्यांना नको असतं. म्हणून त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकला जातो. या बहिष्काराविरोधात सर्वांनी बोललं पाहिजे. अन्यथा बहिष्काराचं जाळं वाढत राहील.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 27 July 2017
  • 1 Comments
  • 2 Like

रामचंद्र गुहांचा फॉर्म्युला यशस्वी होईल काय?

काँग्रेसनं गांधी घराण्याच्या प्रेमापोटी इतर बदल स्वीकारले नाहीत. नेतृत्व बदल केला नाही तर काँग्रेसलाच पर्यायी नवा पक्ष उदयाला येईल, असं भाकीतही गुहा यांनी केलं आहे. तशीही काँग्रेसची गरज संपलेली आहे. काँग्रेसचं नेतृ्त्व असंच आळशी, निष्क्रिय आणि चालढकल नेत्यांच्या हातात राहिलं तर लोक नवा पक्ष उदयाला आणतील. इंदिरा गांधी यांच्या एकछत्री बलदंड सत्तेला पर्याय देण्यासाठी आणीबाणीच्या काळात लोकांतून जनता पक्ष उदयाला.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 19 July 2017
  • 1 Comments
  • 3 Like

ज्याला नाही कोणी, त्याला विखे पाटलांची लोणी

महाराष्ट्रात ज्या राजकीय घराण्यांनी, नेत्यांनी राजकारणाची स्वत:ची खास शैली निर्माण केली, त्यात विखे पाटील यांचं घराणं महत्त्वाचं मानलं जातं. या राजकारणाच्या शैलीला किंवा पॅटर्नला ‘लोणी पॅटर्न’ म्हटलं जातं. अशीच राजकारणाची वेगळी शैली शरद पवार यांच्या घराण्याने निर्माण केली. त्याला ‘बारामती पॅटर्न’ म्हणता येईल. ‘लोणी पॅटर्न’ला ‘बारामती पॅटर्न’पेक्षा जुनी पार्श्वभूमी आहे.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 12 July 2017
  • 0 Comments
  • 2 Like

…तर कदाचित गोपाळकृष्ण गांधी राष्ट्रपती झाले असते!

गांधी नकोत, आंबेडकरही नकोत, या काँग्रेसच्या भूमिकेमुळे नीतिशकुमार दुखावले. कम्युनिस्ट नाराजी दाखवत नसले तरी त्यांचं मौन बोलकं आहे. आणि देशातल्या जनतेला जायचा तो संदेश गेला आहेच. मीराकुमार या हरणाऱ्या उमेदवार आहेत, असा विनोद आता रामदास आठवलेही करू लागले आहेत! गांधी-आंबेडकरांना टाळणारा काँग्रेस पक्ष भाजपच्या आक्रमक राजकारणाला उत्तर कसा देणार, हा गंभीर प्रश्न राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आला आहे.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 05 July 2017
  • 1 Comments
  • 6 Like

कुमार केतकरांच्या भविष्यवाणीतल्या खाचाखोचा

केतकर म्हणतात तसं लोकशाही, सेक्युलर विचार देशात राहिले पाहिजेत यात वाद नाही, पण बेभरवशाचे, लेचेपेचे सैन्य घेऊन ही लढाई थोडीच जिंकता येणार आहे? वाजपेयी, अडवाणींचा भाजप वेगळा होता, आताचा मोदी-शहा यांचा भाजप वेगळा आहे. हा भाजप लोकशाही, सेक्युलर असल्याचं हुशारीने भासवून सत्तास्थानी स्थिरावलाय. पुढची वाटचाल करतोय. त्याला रोखायचं असेल तर त्यापेक्षा जास्त हुशारी दाखवावी लागेल. ती हुशारी राहुल गांधींकडे कधी येणार? .......

  • राजा कांदळकर
  • Wed , 28 June 2017
  • 0 Comments
  • 4 Like

संघ परिवार आणि मोदी-शहापुरस्कृत ‘चांगले ‘हिंदू-दलित’ राष्ट्रपती’!

भाजपने पूर्वी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी घोषित करून आजच्यासारखंच विरोधकांना अडचणीत आणलं होतं. तेव्हाही कलाम यांच्या मुस्लीम असण्याचं भाजपने राजकारण केलं होतं. त्यात कलाम हे ब्रह्मचारी असणं, त्यांची ‘गीता’वरील श्रद्धा, त्यांची ‘मिसाईल मॅन’ अशी प्रतिमा, त्यांचं अणुबॉम्ब बनवण्यातलं योगदान, अशा वर्चस्ववादी गोष्टींना वारेमाप प्रसिद्धी मिळवून दिली होती.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 21 June 2017
  • 2 Comments
  • 2 Like

कर्जमाफीने शेतकऱ्याला दिलासा मिळेल, पण उज्ज्वल भविष्य मिळेल?

...अन्यथा कर्जमाफीची मागणी पुन्हा पाच-दहा वर्षांनी पुढे येणार. त्यात शेतकरी चळवळी अशाच भरकटत राहणार. राजकीय पक्ष, चळवळी यांचा खेळ होत राहील आणि शेतकऱ्यांचा छळ सुरूच राहील. मूळ दुखण्यावर घाव घालणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या चळवळीच्या प्रतीक्षेत महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी आहे. आताच्या कर्जमाफीने त्याला दिलासा मिळेल, पण उज्ज्वल भविष्य मिळेल की नाही याबद्दल शंकाच आहे........

  • राजा कांदळकर
  • Wed , 14 June 2017
  • 0 Comments
  • 3 Like

धनगर समाजाची राजकीय जाणीव टोकदोर होतेय…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९२ जयंती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुमधडाक्यात साजरी होईल. आजच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी राज्यातला धनगर समाज बहुसंख्येनं जमतो. भक्तिभावानं अहिल्यादेवींच्या प्रेरक चरित्राचं जागरण करतो. त्यापासून स्फूर्ती घेतो. दरवर्षी इथं मोठा मेळावा भरतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव इथं जमत आहेत........

  • राजा कांदळकर
  • Wed , 31 May 2017
  • 0 Comments
  • 3 Like

सत्यपाल महाराजांवरचा हल्ला पाच दिवस कुणी लपवला?

गेली किमान ३० ‌वर्षं सत्यपाल महाराजांचं कीर्तन महाराष्ट्र ऐकतोय. करोडो लोक त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेऊन विचारमग्न झाली. अशा मोठ्या कीर्तनकारावर हल्ला होतो आणि त्याने ना सत्तेच्या अंगावर काटा उभा राहतो, ना पोलीस यंत्रणेला पत्रकार परिषद घेऊन लोकांना माहिती द्यावीशी वाटते, ना केईएम हॉस्पिटलच्या प्रमुखांना, ना राज्याच्या गृहखात्याच्या प्रमुखांना प्रसारमाध्यमांशी या विषयावर बोलावंसं वाटतं. .......

  • राजा कांदळकर
  • Fri , 19 May 2017
  • 1 Comments
  • 3 Like

शहाण्या फ्रेंच लोकांचा सांगावा

मॅक्रॉन यांनी प्रचारात ट्रम्प आणि अमेरिकेचा खुलेआम बुरखा फाडला होता. द्वेष आणि मनमानी कारणारा, बाजार, उन्मादी नेते लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी चिघळवत ठेवतात. लोकांना घाबरवून स्वत:चं नेतेपद लादतात. विचार थोपवतात… हे अत्यंत चतुराईनं मॅक्रॉन यांनी फ्रेंचांना पटवून दिलं. म्हणूनच फ्रेंचांनी नेपोलियनची असहिष्णूता नाकारली आणि व्हॉल्टेअरची सहिष्णूता जिंकवली. .......

  • राजा कांदळकर
  • Thu , 11 May 2017
  • 0 Comments
  • 2 Like

ब्राह्मण (आणि इतरही) स्थलांतर का करतात?

स्थलांतरांचा आणि राखीव जागांचा काहीही अर्थाअर्थी संबंध नाही. ब्राह्मण समाजातल्या व्यक्ती युरोप-अमेरिकेत जातात किंवा दुसऱ्या कुठल्याही देशात जातात, त्याचा संबंध नव्या, सुखी जीवनाच्या शोधाशी आहे. आणि यापुढेही राहणार. हे टिळकबाईंनी समजून घेतलं तर ब्राह्मण समाजानं स्थलांतर केलं, हे त्यांच्या पथ्यावरचं पडलं हे त्यांच्या लक्षात येईल........

  • राजा कांदळकर
  • Thu , 04 May 2017
  • 0 Comments
  • 2 Like

पवार-अडवाणी आणि राष्ट्रपतीपदाची रडगाणी!

अडवाणींना नाही पंतप्रधानपद तर निदान राष्ट्रपती होऊ ही आशा होती. पण बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अडचणीत सापडले आहेत. भाजपमधील अडवाणी विरोधकांच्या हाती त्यांना राष्ट्रपती होऊ न देण्यासाठी यानिमित्ताने आयतंच सबळ कारण मिळालं आहे. तर संघ आपल्या वर्तुळाबाहेरील व्यक्तीला राष्ट्रपती करण्यासाठी कितपत तयार होईल? मग भले मोदींची ‘गुरू’ म्हणून पवारांना कितीही पसंती असो........

  • राजा कांदळकर
  • Wed , 26 April 2017
  • 1 Comments
  • 3 Like

नीतीशकुमार महाराष्ट्रात का येत आहेत?

बिहारच्या विकासाचं एक वेगळं मॉडेल देशापुढे मांडणारे नीतीशकुमार मुंबईमध्ये काय बोलतात याविषयी उत्सूकता आहे. बिहारमध्ये त्यांच्या राजवटीत एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली नाही. त्यांनी राज्यात दारूबंदी केली. स्थलांतर थांबलंय. गुन्हेगारीचा दर झपाट्याने कमी होतोय. अशी प्रशंसनीय कारकीर्द असणारे, सर्व जातीधर्मांना बरोबर घेणारे, द्वेषाऐवजी प्रेमाची भाषा वापरणारे नीतीशकुमार हे नेते वेगळ्या धाटणीचे वाटतात.......

  • राजा कांदळकर
  • Thu , 20 April 2017
  • 0 Comments
  • 3 Like

उत्कर्ष-सत्यजित आंबेडकरी रोल मॉडेल का बनू नयेत?

उत्कर्ष शिंदे-सत्यजित कोसंबी हे नव्या शैलीचे कलावंत आंबेडकरी चळवळीला नव्या उंचीवर नेत आहेत. हे तरुण आंबेडकरी चळवळीचे रोल मॉडेल का बनू नयेत? आंबेडकरी समाजात उच्चशिक्षण घेऊन सामाजिक बांधीलकी जपणारे हे दोघेच काही अपवाद नसतील. आणखीही बरेच तरुण असतील. त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने अर्थात १४ एप्रिल निमित्ताने.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 12 April 2017
  • 0 Comments
  • 5 Like

‘संघर्षयात्रे’त ‘यात्रा’ दिसली, पण ‘संघर्ष’ काही दिसला नाही!

सात दिवस विरोधकांनी ऐन रणरणत्या उन्हात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला, पण या यात्रेला लोकांचा प्रतिसाद संमिश्र होता. वर्तमानपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांमध्ये यात्रेच्या बातम्या येत होत्या. वृत्तवाहिन्यावर मात्र फार काही यात्रा दिसली नाही. त्यासाठी एका मराठी वृत्तवाहिनीच्या विरोधात सोशल मीडियामध्ये सरकारधार्जिनी वृत्तवाहिनी म्हणून टीकाही झाली. .......

  • राजा कांदळकर
  • Wed , 05 April 2017
  • 1 Comments
  • 5 Like

नारायण राणे भाजपमध्ये जात आहेत म्हणे!

काँग्रेस संस्कृतीत राणे रमणं शक्य नाही. खरं म्हणजे राणें यांच्या व्यक्तिमत्त्वातला शिवसैनिक इतकी वर्षं काँग्रेसमध्ये टिकला कसा याबद्दल अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात. राणे आता पासष्टीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना स्वत:पेक्षा मुलांच्या राजकीय पुनर्वसनाची काळजी असणार. त्या काळजीपोटी ते सत्तेच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करत असणार, हे उघड आहे. भाजपमध्ये जाण्याची धडपड हा त्या अटीतटीच्या खेळाचा एक भाग आहे.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 29 March 2017
  • 1 Comments
  • 4 Like

नागपूरचा पोपट आणि गावोगावचे डोमकावळे

काँग्रेस-राष्ट्रवादीचे घिसेपिटे चेहरे, त्यांची कर्मं याबद्दल लोकांना उबग आला. आणि त्यावर भाजप स्वार झाला हे वास्तव विरोधक स्वीकारायला आजही तयार नाहीत. आपली सत्ता आपल्याच बदकर्माने गेलीय हे वास्तव न स्वीकारता पोपटासारख्या प्राण्याला मध्ये आणलं तर लोक विरोधकांना डोमकावळचे ठरवणार! पण पोपट, कावळ्यांच्या या खेळात अधिवेशन वाया जातंय. लोकांचं नुकसान होतंय.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 22 March 2017
  • 0 Comments
  • 4 Like

व्हाय सुप्रिया सुळे गो बॅक?

औरंगाबादमध्ये सध्या एक नारा खूप गाजतोय, ‘सुप्रिया सुळे गो बॅक, सुप्रिया सुळे गो बॅक’. का हा नारा गाजतोय औरंगाबादमध्ये? या शहरात मौलाना आझाद ट्रस्ट नावाची ख्यातनाम शिक्षणसंस्था आहे. या नामांकित शिक्षणसंस्थेच्या विश्वस्त म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती झाली आणि त्यावरून वाद सुरू झाला........

  • राजा कांदळकर
  • Wed , 15 March 2017
  • 1 Comments
  • 3 Like

उत्तर प्रदेशने उभे केलेले प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नेहमी शिमगा करणाऱ्यांना उत्तर प्रदेशातल्या विजयाने पुन्हा एकदा तोंडात बोट घालायला लावलं आहे. हा विजय साधासुधा नाही. याला राक्षसी बहुमतच म्हणावं लागेल. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला ४७ जागांवर आपटी खावी लागली, तर काँग्रेसला ७ जागा मिळवून तोंड लपवावं लागलं. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा हत्ती १९ जागांवर गाळात फसला........

  • राजा कांदळकर
  • Sun , 12 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

विखे पाटलांच्या आरोपामागची ‘खरी’ ग्यानबाची मेख काय आहे?

काँग्रेस नेतृत्व प्रभावहीन ठरतंय, ही चर्चा खुद्द काँग्रेस पक्षात उघडपणे सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांच्या मनातली खदखद आता नेत्यांच्या दिशेनं जाईल, यामुळे काँग्रेस नेते घाबरले आहेत. विखे यांचं या घाबरलेल्या नेत्यांत सर्वांत पुढे असणं स्वाभाविक आहे. कारण ते विरोधी पक्षनेते आहेत. अशा बिकट परिस्थितीत तरण्यासाठी विखे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे. त्या आरोपामागं खरं ‘राम’कारण आहे........

  • राजा कांदळकर
  • Thu , 09 March 2017
  • 1 Comments
  • 2 Like

गुरमेहेर, तू ग्रेट आहेस आणि सेहवाग, तू खुजा!

गुरमेहेर १९ महिन्यांपासून ती ही कॅम्पेन करते आहे. रामजस प्रकरणाअगोदरपासून तिची ही भूमिका युट्यूबवर उपलब्ध आहे. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. मग तोपर्यंत अभाविपचं लक्ष गेलं नव्हतं का? तेव्हा रिजिजू, सिन्हा, सेहवाग आणि आता बलात्काराची धमकी देणारे कुठे होते? रामजस प्रकरणात गुरमेहेरने अभाविपविरुद्ध भूमिका घेतल्यावर त्यांनी तिची भारत-पाक शांततेसंबंधीची भूमिका वादग्रस्त ठरवली.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 01 March 2017
  • 7 Comments
  • 3 Like

देवेंद्र फडणवीसांनी ‘खोदा पहाड, (मगर) निकला जिनी’!

युरोप-अमेरिकेत राजकीय पक्ष पोलिटिकल कार्पोरेशन म्हणून काम करतात. भाजप त्या वाटेनं प्रवास करत आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी प्रोफेशनल पद्धतीने मुंबई राज्याचा पहाड खोदला… त्यातून त्यांच्या हाती जिनी लागला. हा जिनी त्यांची हवी ती इच्छा पूर्ण करू शकेल. हा जिनी जोपर्यंत फडणवीस यांच्या हातात आहे, तोपर्यंत राज्यात ‘देवेंद्रपर्व’ सुरू राहील........

  • राजा कांदळकर
  • Mon , 27 February 2017
  • 0 Comments
  • 2 Like

फडणवीस पडोत, ही कुणाकुणाची इच्छा!

पक्षाचा विस्तार करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बाजी; आक्रमक प्रचार, जाहिराती करण्यात बाजी; सेनेला धोबीपछाड करण्यात बाजी; राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक फोडण्यात बाजी; या सगळ्यामुळे फडणवीस पडो ही सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वांची इच्छा नसली तरच नवल! फडणवीसांची ही बाजी भाजपमध्येही अनेकांना खुपत असणार हेही स्पष्ट आहे. खुद्द नितीन गडकरी केंद्रातून राज्यात येण्यासाठी उत्सुक आहेत........

  • राजा कांदळकर
  • Wed , 22 February 2017
  • 1 Comments
  • 1 Like

चेहरे, चरित्र, अजेंडे एकसारखेच; वोट दिये, तो दिये किसे?

विविध पक्षांची, नेत्यांची वक्तव्यं, त्यांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप, आव्हानं, इशारे काय सांगतात? त्यांना एकमेकांवर कुरघोडी करण्याचीच ईर्ष्या लागलीय. मी दुसऱ्यापेक्षा बेहतर, प्रभावी कसा आहे, हे सिद्ध करण्याच्या नादात हे नेते गुरफटले आहेत. जनतेचं भलं कशात आहे, हे नेते, त्यांचे पक्ष जवळपास विसरलेत की काय, अशी शंका यावी इतपत त्यांच्या प्रचाराची पातळी तळाला गेलीय. हे नेते आम्ही एकाच माळेचे मणी आहोत, हे स्वत:हून दाखव.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 15 February 2017
  • 0 Comments
  • 2 Like

“शरद पोंक्षेंचा खून करायचाय! काय करू?”

“नथुरामा तुझी अवस्था पाहून दु:ख वाटतं रे. घड्याळाचे काटे उलटे फिरवता आले असते तर तुलाही नेलं असतं माझ्या सोबत आफ्रिकेला, भारत दर्शनाला, इंग्लंडला, नौखालीला. दाखवलं असतं तुला जगातलं द्वेष आणि प्रेमाचं चिरंतन द्वंद्व. ओळख करून दिली असती तुला प्रेमातून निपजणाऱ्या सुखाची, शांततेची आणि मानवतेची. पण आता सगळंच तुझ्या-माझ्या हाताबाहेर गेलंय. मला अनुसरणं नेहमीच अवघड आहे, तुला अनुसरणं मात्र आजकाल खूप सोप्पं झालंय.”.......

  • राजा कांदळकर
  • Wed , 25 January 2017
  • 4 Comments
  • 3 Like

शशिकला तमिळनाडूच्या ‘नव्या अम्मा’ होतील?

तमिळ जनता व्यक्तिपूजक जास्त. त्यांना हिरो, नेते डोक्यावर बसून घेणं आवडतंच, पण ते पहिल्यांदा काही सहजासहजी त्यांचं मोठेपण स्वीकारत नाहीत. या अग्निदिव्यातून शशिकला यांनाही जावं लागणारच. तमिळी जनतेच्या विविध फुटपट्ट्यांतून त्या पास झाल्या तरच लोक त्यांना नवी अम्मा म्हणून स्वीकारतील........

  • राजा कांदळकर
  • Thu , 12 January 2017
  • 0 Comments
  • 1 Like

अखिलेश यादव : घराणेशाहीला नव्या वळणावर नेणारा ‘आज’चा नेता

साडेचार वर्षांत अखिलेश यांनी विकास करणारा माणूस म्हणून सामान्य लोकांत किती स्थान मिळवलं आहे, हे येत्या निवडणुकीत दिसेल. आता बंड तर झालंच आहे. समाजवादी पक्ष खरा कुणाचा? यादव-मुस्लीम व्होटबँकेचे धनी कोण? याचाही निकाल निवडणुकीत लागेल. सध्या सायकल कुणाची हा मुद्दा किरकोळ आहे. सत्तेचा कल कुणाला मिळो न मिळो, पण या बंडाने घराणेशाही राजकारणाला नव्या वळणावर नेऊन ठेवलं, हा या बंडाचा खरा अर्थ आहे........

  • राजा कांदळकर
  • Wed , 04 January 2017
  • 0 Comments
  • 1 Like

बाप रे! हे शंकराचार्य हिंदू धर्म बुडवणार की काय?

शंकराचार्यांना लेकुरे उदंड झाल्याने लक्ष्मी पळोन जाते, ही स्वामी रामदास यांची मतं माहीत नाहीत असं नाही. त्यांना हे कळत नाही या भोळ्या समजुतीत आपण न राहिलेलं बरं. मुख्यमंत्री, साधू, शंकराचार्य या सर्व लोकांना ते स्वत: जे बोलतात, ऐकतात त्याचा अर्थ कळतो. ते तेवढे सुज्ञ नक्कीच आहेत, पण एका व्यापक राजकारणाचा भाग म्हणून हे लोक असे मुद्दे मांडत असतात........

  • राजा कांदळकर
  • Wed , 28 December 2016
  • 0 Comments
  • 3 Like

‘तैमूर’ या अरेबिक शब्दाशी आपलं भांडणं असण्याचं काही कारण नाही!

तैमूर हे नाव फक्त त्या अत्याचारी शासकाशी जोडलेलं आहे म्हणून कुणी ठेवू नये असं नाही. मुळात तैमूर हा अरेबिक भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ पोलादी, खुद्दार, इमानदार, न वाकणारा, खंबीर असा आहे. या चांगला अर्थ असणाऱ्या अरेबिक शब्दाबरोबर आपलं भांडणं असण्याचं काही कारण नाही. मध्य आशियात अनेक कुटुंबात तैमूर हे मुलाचं नाव ठेवलेलं आढळतं. इतिहासकार इरफान हबीब यांच्या एका मित्राच्या मुलाचं नाव तैमूर आहे........

  • राजा कांदळकर
  • Thu , 22 December 2016
  • 0 Comments
  • 3 Like

संभाजी ब्रिगेड : सामाजिक संघटनेपासून राजकीय पक्षापर्यंत...

सध्या मराठा समाजात भयंकर अस्वस्थता आहे. ती सत्ताधारी भाजप, सेनेविरोधात आहे, तशी काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधातही आहे. जातीतल्या नेत्यांबद्दलही लोकांना राग आहे. हा राग संघटित करून त्याचे राजकीयीकरण करणे हा संभाजी ब्रिगेडचा हेतू दिसतो. लोकशाही व्यवस्थेत असे राजकीय पर्याय निर्माण होणे हे साहजिक आहे........

  • राजा कांदळकर
  • Wed , 14 December 2016
  • 3 Comments
  • 1 Like

नागपूर अधिवेशन : कर्मकांड की करमणूक?

आधीच नागपूर अधिवेशनावर आधारित एका मराठी चित्रपटाची जाहिरात टीव्हीवर झळकते आहे. या चित्रपटाचे नावच आहे - 'नागपूर अधिवेशन - एक सहल'. या चित्रपटात नेमके काय दाखवले आहे, ते चित्रपट बघितल्यावरच कळू शकेल, पण या चित्रपटात आमदारांची प्रचंड टिंगलटवाळी केलेली असावी, असा बोध जाहिरातीतून होतो आहे. .......

  • राजा कांदळकर
  • Wed , 07 December 2016
  • 1 Comments
  • 1 Like

कोण म्हणतं फिडेल मेला?

स्वप्नाळू माणसं अनेकदा वास्तववादी नसतात. क्रांतिकारक अनेकदा अव्यवहारी आढळतात. सिद्धान्तवादी, वैचारिक माणसं बऱ्याचदा कृतीकडे पाठ फिरवतात. हे मानवी जीवनातले पेच, क्रांतिकार्याच्या प्रक्रियेतले धोके फिडेल कॅस्ट्रो-चे गव्हेरा यांनी टाळले. स्वतःचं जीवन आणि तत्त्वज्ञान सतत नवं राहावं, जिवंत राहावं, खळखळतं राहावं याची काळजी त्यांनी घेतली........

  • राजा कांदळकर
  • Mon , 28 November 2016
  • 0 Comments
  • 1 Like

साताऱ्याचा स्वाभिमान आणि बारामतीचा आदेश

या निवडणुकीत पक्षांच्या निष्ठेपेक्षा पैसा जिंकला. पक्षनिष्ठा, तत्त्व या साऱ्याला या निवडणुकीत तिलांजली देण्यात आली. उमेदवारांनी लक्ष्मीदर्शनाला महत्त्व दिले. स्वत: पैसा वाटून निवडून आलेले लोक स्वत:चे मतदान साधूवृत्तीने करणार नाहीत हे उघडच आहे. त्यामुळे या निवडणुकीत पैसा वाटून निवडून आलेल्यांची मते अधिक पैसा वाटून मिळवण्याची चढाओढ झाली असणार, यासाठी कुठल्या पुराव्याची गरज नाही........

  • राजा कांदळकर
  • Wed , 23 November 2016
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.